दगड ठेवून हृदयावर मी एक नीर्णय घेत आहे ।
सोडून तुम्हा सर्वाँना कायमचा आज जात आहे ।
नसत्या आरोपांची काहि बोटे उठली माझ्याकडे ।
पाहनार नाही पुन्हा मागे वळुन कधीच तुमच्याकडे ।
निर्णय माझा अटळ आहे वाईट मला समजू नका ।
पुन्हा कुणाच मन नाजुक मौजेसाठी तोडू नका ।
आठव तूमचा रोज येईल पण मी माञ येणार नाही ।
तूमच्या नी माझ्यातल अंतर आता कधीच दुर होनार नाही ।
साथ होती तूमची माझी फक्त काही क्षणांसाठी ।
आस होती मनापासून निर्मळ अशा मैञीसाठी ।
कधी चुकून कुणाला वेड-वाकड बोललो असेल ।
दोश काही नसुन त्यात फक्त आपलेपणा असेल ।
आलेलो मी इथे फक्त आपुलकीच एक नातं जोडायला ।
पण शक्य असेल तर माफ करा तुमच्या
लाडक्या "कविकुमार"ला . . . . .।।।।।
................................-कविकुमार
(17 ऑगस्ट 2011 )
No comments:
Post a Comment