Thursday 29 August 2013

-:( नर्तकी ):-



गजल 

नाचणाऱ्‍या पावलांचा गाव वेडा 
त्यातला हा पैँजणांचा भाव वेडा 

लाज माझी बांधली मी घुंगरूला 
वासनेच्या भावनांचा डाव वेडा 

काय सांगू या भुकेल्या पाखरांना 
हंबऱ्‍याने घातला घेराव वेडा 

उसळते ही लाट माझ्या काळजाची 
वाहणाऱ्‍या आसवांचा घाव वेडा 

सोनियाच्या आठवांचा तू कुमारा 
शोधतो जो जीवनाचा ठाव वेडा 

कविकुमार - 
(१७।२।१३)

-:( मरणाच्या दारावर ):-



मरणाच्या दारावर 
मागे वळुन पाहताना 
स्वतःला पाहिलय मी 
जीवनाकडुन हारताना 

झगडलो ज्या आयुष्यासाठी 
ते तर कमी होतच गेल 
जगायच अस म्हणतानाच 
तीळ तीळ मागे सुटत गेल 
स्वतःलाच पाहिल जेव्हा 
क्षणा क्षणाशी लढताना 
मरणाच्या दारावर 
मागे वळुन पाहताना 

आयुष्याच्या वाटेवरती 
अनेक नाती जुडत गेली 
आपुलकीने सांभाळुनही 
काहीच क्षणांत तुटून गेली 
स्वतःलाच उगाळले मी 
नात्यांसाठी जगताना 
मरणाच्या दारावर 
मागे वळुन पाहताना 

कविकुमार - 
(१८।५।१३)

-:( मुर्त विठ्ठलाची ):-


ती मुर्त विठ्ठलाची 
कना- कनात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

आज लागला रे 
ध्यास पंढरीचा 
विठुमाऊलीच्या 
तृप्त दर्शनाचा 
माय बाप पांडुरंग 
चरा- चरात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

मला लाभला रे 
वसा संततीचा 
ज्ञाना , सावता 
तुका अन् जनीचा 
निजरुप तुझे देवा 
मना- मनात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

शब्दाचीच ओवी 
शब्दाचे अभंग 
शब्द झाले धन्य 
बोलता श्रीरंग 
नाम तुझे कृपावंता 
मुखा- मुखात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

कविकुमार - 
(२२।५।१३)

-:( शोध ):-



गजल

शोध माझ्या जीवनाचा मीच घ्याया लागलो 
अंगणी माझ्याच जेव्हा मी जळाया लागलो 


घाव माझ्या वेदनेचे पाहिले नाही कुणी  
दुःख तेव्हा आसवांनी भागवाया लागलो 

कापलेले पंख माझे हारलो ना मी तरी 
भेदण्या
 आकाश तेव्हा मी उडाया लागलो 

काल होते दोस्त माझे तेच वैरी जाहले 
दुश्मनांशी मी लढूनी सावराया लागलो 

माजला दुष्काळ जेथे कोपलेल्या देवता
थेँब झालो अंकुराचा पाझराया लागलो

कविकुमार - 
(१५।५।१३)

-:( डबकं ):-


आयुष्य हे एखाद्या प्रवाहाप्रमाणे असतं 
वाहनं थांबल की "डबकंच" 

माग आपन बनतो त्या डबक्यातले बेडुक 
या डबक्याबाहेरही एक जग आहे हे जणु विसरूनच जातो 

ज्या दुर्घटनांनी आपल्याला ठेच दिली आपन त्यांचाच विचार का करतो ? 
त्यापेक्षा अशा दुर्घटनांवर मात करत आपला वेगळा मार्ग शोधने योग्य 

ज्याप्रमाणे प्रवाह अडथळ्यांना भेदुन आपला मार्ग शोधतो अगदी तसाच 

आयुष्य खुप सुंदर आहे 
कधी दुःखाचे खाचखळगे 
कधी सुखाचे तरंग आहे 

कविकुमार - 
(८।५।१३)


-:( गुपित ):-


हसता मला न आले 
रडता मला न आले 

कळले गुपित आता 
जगता मला न आले 

तुटली कधीच नवका 
तरता मला न आले 

जगने जरी न युद्ध 
हरता मला न आले 

असता मनात माझ्या 
सजता मला न आले 

झुकताच मान त्यांची 
लढता मला न आले 

जळला 'कुमार' जेव्हा 
मरता मला न आले 

कविकुमार - 
(२७।४।१३)

-:( प्रारब्धा थीगळ ):-



सावरले पापनीला 
आला पोटाशी ओघळ 
भावनांशी झुंजताना 
लागे प्रारब्धा थीगळ 

ढग दाटले मनात 
शब्द आडले ओठात 
गोठलेल्या लेखनीला 
माझ्या आसवांची भ्रांत 

पाणी आटताना आला 
पहा श्रावनाचा मास 
तृष्णेपाई ओढावला 
मृगजळाचा तो भास 

गंध मातीचा दरवळे 
ऋतु आठवाचे ओले 
लागे मनात हालाया 
जुन्या क्षणांचे ते झुले 

वळताना आज वाती 
गुज मनाचे कथीले 
लावताना शब्दज्योत 
प्रेम दिव्यात ओतीले 

कविकुमार - 
(२०।३।१३)

-:( पानवठा ):-


जीवन हे एखाद्या 
पानवठ्यासारख असत 

क्षणभर विसावा घ्यावा 
पाणी चाखुन तृप्त व्हाव 
आणि पुन्हा आपल्या सरतेपोटी 
पंखात आभाळ भराव 

एका नव्या दिशेच्या शोधासाठी 

कविकुमार - 
(३।४।१३)


-:( जीवनाचे तरंग ):-



जीवन म्हणजे एकाच जलपृष्ठावरील नाना तरंग 

काही सुखाचे तर काही दुःखाचे तरंग 
सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख दडल असत 

ज्या सुखासाठी जीवनाशी झगडतो 
त्यातुन निष्पन्न माञ दुःखच हाती लागत 

अपेक्षांच्या ओझ्याखाली नकळत मीळनार दुःख 
हे सुखापेक्षा जास्त तीव्र वाटत 

पन ईथे सुखाला पुर्णपने उपभोगन्यापेक्षा 
दुःखाला कवटाळन्यातच जीवन व्यतीत करन 
आपन स्वतःच पसंत करतो 

आजचा अत्ताचा क्षण माझा समजुन जगण्यापेक्षा 
कालच्या आठवनी आणि उद्याची चिँता 
यातच तो क्षण खर्च होतो 

हाती काल नाही म्हणुन रडायच 
उद्या केव्हा उगवेल म्हणुनही रडायच 
आणि आज वाया गेला म्हणुनपन रडायच 

आयुष्याचा तरंग जेव्हा नाहीसा व्हायला लागतो 
तेव्हा समजत "जीवन खुप सुंदर होत ! 
मला ते अनुभवताच नाही आल " 

कविकुमार - 
(२८।३।१३)