Sunday 14 September 2014

-:( आता ):-

गजल 

जीवनाची शोधली मी रीत आता ! 
पेरतो शब्दात माझ्या गीत आता !! 

दान मागायास आलो यातनांचे ; 
वेदना दे फक्त या झोळीत आता !! 

तेल नाही , तूप नाही , वात नाही ; 
आसवांना जाळतो पणतीत आता !! 

चाललो ठेवून मागे दुःख माझे ; 
दाटते डोळ्यांत वेडी प्रीत आता !! 

ईश्वरा , मी ज्या ठिकाणी जन्मलेलो ; 
जाळ मजला त्याच तू मातीत आता !! 

कविकुमार - 
(१४।९।१४)


Saturday 6 September 2014

-:( भास होता ):-



-:( माणसे ):-

भासली साधीच तेव्हा बोलणारी माणसे !
भेटली नाही मनाला भावणारी माणसे !!

वाटली होती अशी लाचार झाली श्वापदे ;
स्वार्थतेपोटी जगाला चावणारी माणसे !!

जन्मभर ज्याने सुखाचे ते निखारे सोसले ;
पहिली त्या माणसांना जाळणारी माणसे !!

गायले त्यांनीच होते जीवनाचे गोडवे ;
एक प्याला जिंदगीचा प्राषणारी माणसे !!

भेद एसा कोणता केला विधात्याने कधी ?
धर्म , जाती वेगळ्या ही थाटणारी माणसे !!

एक आहे तो जिवात्मा अंतरी जो नांदतो ;
पत्थरांना दैव सारी मानणारी माणसे !!

कविकुमार -
(६/८/१४)

Friday 5 September 2014

-:(फार झाले):-

गजल 

हे कोणते गुलाबी हलकेच वार झाले ? 
नजरेतल्या अदेने घायाळ फार झाले !! 

तू पाहिलेस जेव्हा लाजून या दिशेला ; 
माझ्याच काळजाचे तुकडे हजार झाले !! 

मी शोध घेत आहे माझ्याच त्या मनाचा ; 
समजेच ना मला ते कोठे पसार झाले ? 

तू भेटलीस आता जगण्यात सोबतीला ; 
माझेच जीवनाशी काही करार झाले !! 

सांगू कुणास आता हे हाल काळजाचे ? 
संचीत भावनांचे हृदयास भार झाले !! 

कविकुमार - 
(१५।७।१४)


-:( आस वेडी ):-

सारं काही तेव्हारख 
आपोआपच घडत होत ! 
आज तिच्या आठवणीँत 
चक्क आभाळ रडत होत !! 

भेगाळलेली जमिन 
अण् दाटले होते ढग ! 
मेघ म्हणाले धरतीला 
मला एकदा तरी बघ !! 

करपलेली माती आता 
त्याचीच वाट पहात होती ! 
तू बरस आता माझ्यावर 
तिची नजर सांगत होती !! 

वारा उनाड झाल्यासारखा 
सैरा-वैरा पळत होता ! 
या दोघांची आस वेडी 
तो गमतीने बघत होता !! 

ढगं अलगद वार्यासोबत 
दूर-दूर निघून गेले ! 
धरतीचेही चित्त तेव्हा 
आपल्यासोबत घेवून गेले !! 

तेव्हाच मला वाटत "प्रेम" 
पावसाच्या थेँबांसारख असत ! 
गोळा करण्याच्या प्रयत्नातच 
ते हरवून जात असत !! 

कविकुमार - 
(२२।७।१४)