सारं काही तेव्हारख
आपोआपच घडत होत !
आज तिच्या आठवणीँत
चक्क आभाळ रडत होत !!
भेगाळलेली जमिन
अण् दाटले होते ढग !
मेघ म्हणाले धरतीला
मला एकदा तरी बघ !!
करपलेली माती आता
त्याचीच वाट पहात होती !
तू बरस आता माझ्यावर
तिची नजर सांगत होती !!
वारा उनाड झाल्यासारखा
सैरा-वैरा पळत होता !
या दोघांची आस वेडी
तो गमतीने बघत होता !!
ढगं अलगद वार्यासोबत
दूर-दूर निघून गेले !
धरतीचेही चित्त तेव्हा
आपल्यासोबत घेवून गेले !!
तेव्हाच मला वाटत "प्रेम"
पावसाच्या थेँबांसारख असत !
गोळा करण्याच्या प्रयत्नातच
ते हरवून जात असत !!
कविकुमार -
(२२।७।१४)
No comments:
Post a Comment