अस म्हणतात सोडुन गेलेले
नंतर एक चांदणी बनतात
दूरूनच का होईना ते
आपल्यावर नजर ठेवत असतात
रोज रात्री जागुन बाळा
मी तुला शोधत असतो
डोळ्यात तुझी प्रतीमा ठेवुन
चांदण्यांना ओळख विचारत असतो
मनापासुन सांगतो लाडो
तुझी खुप आठवन येते
आधी मधी स्वप्नात माझ्या
कधी कधी डोकावुन जाते
मध्येच एक तारा तुटतो
आणि अचानक नाहीसा होतो
लपंडावाचा खेळ असा
रोजच नवा साजरा होतो
तू नाहीस पन बरोबरचे
ते क्षण फक्त वाट्यात आहेत
दिवस कितीही लोटले तरी
आठवनी तुझ्या ताज्याच आहेत
जान्याआधी फक्त एकदा
मला काही सांगीतल असत
देवाला सांगुन मी तुला
माझ आयुष्य दिल असत
माझ आयुष्य दिल असत . . ।।
कविकुमार -
(१७।३।१३)