जीवन म्हणजे एकाच जलपृष्ठावरील नाना तरंग
काही सुखाचे तर काही दुःखाचे तरंग
सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख दडल असत
ज्या सुखासाठी जीवनाशी झगडतो
त्यातुन निष्पन्न माञ दुःखच हाती लागत
अपेक्षांच्या ओझ्याखाली नकळत मीळनार दुःख
हे सुखापेक्षा जास्त तीव्र वाटत
पन ईथे सुखाला पुर्णपने उपभोगन्यापेक्षा
दुःखाला कवटाळन्यातच जीवन व्यतीत करन
आपन स्वतःच पसंत करतो
आजचा अत्ताचा क्षण माझा समजुन जगण्यापेक्षा
कालच्या आठवनी आणि उद्याची चिँता
यातच तो क्षण खर्च होतो
हाती काल नाही म्हणुन रडायच
उद्या केव्हा उगवेल म्हणुनही रडायच
आणि आज वाया गेला म्हणुनपन रडायच
आयुष्याचा तरंग जेव्हा नाहीसा व्हायला लागतो
तेव्हा समजत "जीवन खुप सुंदर होत !
मला ते अनुभवताच नाही आल "
कविकुमार -
(२८।३।१३)
No comments:
Post a Comment