आज पुन्हा आठवण आली त्याच चिमुकल्या पावलांची !
पाचोळ्या प्रमाणे उडून गेलेल्या त्याच हळव्या दिवसांची !
अजूनही आठवत तू माझी किती काळजी घ्यायचीस !
शाळेत मला जायचं म्हणून तू लवकर उठायचीस !
परतीच्या वेळेला तुझ्या नाझरा मला शोधायच्या !
आत्ता येईल मग येईल अशी समजूत तुझी घालायच्या !
रोज एक नवी कहाणी मी तुला एकवायचो !
त्यातून काय शिकलो हे आवर्जून सांगायचो !
नेहमीच हट्ट करून तुला खूप त्रास द्यायचो ना !
रुसलीस कधी माझ्यावर मीच तुला मनवायचो ना !
रुसव्या फुगव्याचे खेळ ते किती मजेशीर होते !
आई तुझ्या चरणावरती माझे एक स्वर्ग होते !
कळलच नाही ते दिवस कसे हरवुन गेले !
जसे साखरेचे कण पाण्यात हळूच वीरगळून गेले !
...........................................कविकुमार
wha
ReplyDelete