मी समजवेल माझ्या मनाला
तुझ्या आठवनी विसरायला
तु दिलेल्या विरहाला
एकांतात सहन करायला
आधि दिलेस बेशुमार प्रेम
आणि आता खोलवर घाव दिलेस
मनाचा माझ्या विचार
न करता सांग का गं दुर केलेस ?
आज विसरलीस तु त्या
दिवसांना जेव्हा मी तुझा
एकांत दुर करायचो
तुझे आश्रु पुसून तूला कुशीत
घेवून मी पण रडायचो
आज माझ्या एकांताला तूझ्या
आधाराची गरज आहे
झाले गेल सर्व विसरुन
निर्मळ नाते जपायचे आहे
..........-कविकुमार
( १३ नोव्हेंबर २०११ )
No comments:
Post a Comment