गजल
हा रोज चाललेला लीलाव भावनांचा
हे शब्द स्तब्ध होते माझ्याच मानसांचा
नुसत्याच वासनांचा येथेच पावसाळा
त्याला महत्व आहे काळ्याच कागदांचा
थैमान माजलेला प्रत्येक आसवांचा
ना अर्थबोध त्याला माझ्याच झुरण्यांचा
नाहीच अन्नदाता झोपू कसा उपाशी
हा खेळ उंदिराचा आनंद मांजरांचा
तू सांग सोनियाचा येणार दिवस केव्हा
आहे सभोवताली हा काळ राक्षसांचा
पाही कुमार माझ्या बागेत रोपट्यांना
आतूर जीव आहे त्याच्याच रक्षणांचा
कविकुमार
(१-४-२०१२)
हा रोज चाललेला लीलाव भावनांचा
हे शब्द स्तब्ध होते माझ्याच मानसांचा
नुसत्याच वासनांचा येथेच पावसाळा
त्याला महत्व आहे काळ्याच कागदांचा
थैमान माजलेला प्रत्येक आसवांचा
ना अर्थबोध त्याला माझ्याच झुरण्यांचा
नाहीच अन्नदाता झोपू कसा उपाशी
हा खेळ उंदिराचा आनंद मांजरांचा
तू सांग सोनियाचा येणार दिवस केव्हा
आहे सभोवताली हा काळ राक्षसांचा
पाही कुमार माझ्या बागेत रोपट्यांना
आतूर जीव आहे त्याच्याच रक्षणांचा
कविकुमार
(१-४-२०१२)
No comments:
Post a Comment