Sunday 9 March 2014

-:( प्रेम ):-

डोळ्यात तेव्हा खरे प्रेम होते नजरेतुनी प्रेम उमलायचे ! 
जरी बोल माझे मुके जाहलेले अबोल्यातही शब्द भेटायचे !! 

तुझी ओढ आता मला लागलेली किती मी दुरावेच सोसायचे ? 
तुझ्या आठवाचे किती पावसाळे मनाला उगा चिँब भिजवायचे ! 

फुलांनी फुलांना कधी माळले की गुलाबातही गंध दाटायचे ! 
ऋतुंनी ढगांना जरा गाठले की नव्याने जुने कोँब उगवायचे !! 

नभाचा किती खोल काळोख होता किती चांदणे त्यात चमकायचे ! 
जरा एक तारा कधीही निखळता चंद्रासही दु:ख  वाटायचे !! 

असेही किणारे प्रतिक्षेत होते लाटेस तेव्हा उरी घ्यायचे ! 
मनाने मनाला दिलेले वचनही नवा जन्म घेवून पाळायचे !! 

कविकुमार - 
(५।३।१४)


No comments:

Post a Comment