डोळ्यात तेव्हा खरे प्रेम होते नजरेतुनी प्रेम उमलायचे !
जरी बोल माझे मुके जाहलेले अबोल्यातही शब्द भेटायचे !!
तुझी ओढ आता मला लागलेली किती मी दुरावेच सोसायचे ?
तुझ्या आठवाचे किती पावसाळे मनाला उगा चिँब भिजवायचे !
फुलांनी फुलांना कधी माळले की गुलाबातही गंध दाटायचे !
ऋतुंनी ढगांना जरा गाठले की नव्याने जुने कोँब उगवायचे !!
नभाचा किती खोल काळोख होता किती चांदणे त्यात चमकायचे !
जरा एक तारा कधीही निखळता चंद्रासही दु:ख वाटायचे !!
असेही किणारे प्रतिक्षेत होते लाटेस तेव्हा उरी घ्यायचे !
मनाने मनाला दिलेले वचनही नवा जन्म घेवून पाळायचे !!
कविकुमार -
(५।३।१४)
No comments:
Post a Comment