Tuesday 12 June 2012

-: चक्रव्युह विचारांचे :-




झाला सुळसुळाट येथे 
अस्तित्व मुळाचे संपले 
काँपी पेस्ट करुनिच 
नाव स्व:ताचे टाकले 

कवी लाचारा सारखे 
शोध घेतो चोरट्याचा 
कोणी चोरले हृदय 
कोणी काळीज फाडले 

कवितेला पंख आले 
तीच उडुनीया गेली 
जन्मदात्याचे ते ऋण 
तीच विसरुनी गेली 

मोठी वेदना मनाची 
पाणी डोळ्यांतुनी वाहे 
मुका समाज भोवती 
खेळ भावनेचा पाहे 

नको आता ही जखम 
नको सुगावा सुखाचा 
एक थीनगीच हवी 
शोध घ्याया सत्यतेचा 

चक्रव्युह वीचारांचे 
झाली शब्दांची लडाई 
घावे एक अभीमन्यु 
जीव गमावीला ठाई 

-कविकुमार 
(११।६।२०१२ / ३:१५ AM)

No comments:

Post a Comment